17 ऑगस्टपासून शाळा सुरू होण्याची शक्यता
17 ऑगस्टपासून राज्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. पुढील आठवड्यात शिक्षण विभागाची बैठक आहे, त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यावर चर्चा केली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
“आम्ही 17 ऑगस्टपासून ग्रामीण भागात 5-8 च्या वर्गांसाठी शाळा पुन्हा उघडणार आहोत. शहरांमध्ये, #COVID19 प्रोटोकॉलचे पालन करताना 8 ते 12 च्या वर्गांसाठी पुन्हा उघडतील”-महाराष्ट्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
सध्या इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होतील. 1 ऑगस्ट रोजी ब्रेक द चेन अंतर्गत जारी केलेले नियम, राज्य सरकारला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार देतात. कोरोना महामारीमुळे राज्यात मार्च 2020 पासून शाळा बंद आहेत. आता शिक्षण विभागाने लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पहिली बैठक झाली.